3 views
विझुनीही तयांचे एल्गार केवढे......
कुणी काजव्यांचे सुर्य माळले
क्रांतीचे तयानी हुंकार मांडले,
कित्तेक पणत्या दिवे विझाले
विझुनीही तयांचे एल्गार केवढे......
पांगळे पाय आता धावू लागले
छाटले पंख ज्यांचे ते उडू लागले
जे जे गाडले होते मढे तयानी तेंव्हा
चित्कारून छाती बडवू लागले......
बुध्दी बळाचा खेळ विनाशीच ठरला
बुद्धीतून बुद्ध डोकावूं लागले
फरशा विचारांचा केंव्हाच पाडला
प्रस्तापित श्वान उगीच कोकळू लागले......
© तुझी कविता #Poonit
Related Stories
2 Likes
0
Comments
2 Likes
0
Comments