...

4 views

लग्न, प्रेम, समाज
लग्न हि एक अशी गोष्ट आहे, जी दोन लोकांना जीवनभर सोबतीने टिकावी लागते, प्रेमाने, मायेने, चिंतेने, चिंतनाने, नवीन योग्य विचाराने हि गोष्ट सांभाळावी लागते... या गोष्टीला अर्थपूर्णतेचा विचार दिला जातो, आणि तोच विचार आयुष्यभर सोबतीने पाळला जातो, निभावला जातो...

लग्न हि काय जबाबदारी नाही... हे तर पवित्र बंधन आहे, जे सात जन्मांच मानलं जात... ते सात जन्मापर्यंत निभावलं जातं...

मग तुम्हीच विचार करा, सात जन्माचं नातं, काय एका दिवसात एकमेकांना पाहून ठरवल जात असतं काय?? फक्त दिसण्यावरून होत असतं काय??

मला आजही हि प्रथा आवडत नाही, भले हि तुम्ही कोणत्या हि प्रकारे लग्न करा(arrange marriage or love marriage) पण ज्या दोघांना जन्मो-जन्मी राहायचं, त्यांना तर एकमेकांसाठी, एकमेकांचे विचार जाणून घेण्यासाठी वेळ द्या... का सगळं मोठी माणसे, घरचीच लोकं ठरवतील काय???

त्या भेटीसाठी कदाचित तो मुलगा, व ती मुलगी चांगली वागवणूक वर्तवते, पण पुढे अशीच वागवणूक, तो वा ती ठेवेल काय याची काय गा.... ?? जोपर्यंत, मुलाला आणि मुलीला एकमेकांचे विचार पटत नाहीत, जोपर्यंत त्यांना त्यांचे अर्थपूर्ण आयुष्य दिसत नाहीत, तोपर्यंत ते तरी कसे राजी होतील??

आपण विचार नंतर पाहतो, कधी तर पाहतही नाही... पाहिलं पाहतो तर काय... बंगला चांगला आहे का?? गाडी आहे का?? पोरगं चांगल्या नोकरीला आहे का??? पोराला पगार चांगला आहे का?? जमीन किती आहे?? मग जातो आपण, सासू च्या स्वभावाकडे... मग, मुलीला काय काय येतं, स्वयंपाक वगैरे...

झालं, पोरगी दिसायला छान, सुगरण आहे, दिसायला दिसते संस्कारी... पोरगं नोकरीला आहे, बाकी जमीन, बंगला-गाडी आहे, दिसायला हि छान आहे...

मग जमतं कि इथचं...

मी म्हणत नाही कि सुगरण, चांगले दिसणे गोष्टींकडे दुर्लक्ष करा... नक्कीच लक्ष द्या या गोष्टींकडे, पण प्राधान्य हे त्यांच्या विचारांना द्या, एकमेकांच्या विचारांच्या पसंतीला द्या, स्वभावाला द्या...

पण यासाठी वेळ द्यावा लागतो, खरं काय ते समजून घ्यावं लागतं... बरोबर ना????

अहो, थांबा कि... अजून तर सर्वात महत्वाचं म्हणजे, राशी भविष्य तर राहीलचं कि....

ते तर फारचं कठीण... हा अपशकून, तो अपशकून... हि अशीच निघेल, तो तसाचं निघेल, कारण कुंडलीत दोष आहे, मग करा हि पूजा, आणि करा ती पूजा... जर पूजा करूनही काही झालं नाही, आणि जर काही अनर्थ ठरलं तर येतचं मग हिच्याचं मुळे झालं.... नाहीतर त्याच्याचं मुळे झालं...

 

खरचं तुम्हाला वाटतं कि, ज्योतिष लोकांना या आपल्या धरतीवरून हे तारे तुमच्यात अशी अडचण घालतील, तशी अडचण घालतील समजत असेल???

मी काही कुणाचा विश्वास तोडण्याचा प्रयत्न करत नाहीये, पण जे सत्य आहे तेच सांगतेय....
अहो, हे तर माहित आहे ना...! “everything happens for a reason” यात कसा काय कुणाचा दोष असू शकतो मग?? आणि कसं काय हे तारे, ग्रह आपल्या जीवनात अडचणी निर्माण करत असतील?? कधी विचार केला आहे का??

आपल्या विचारांच्या संसारात अडचणी निर्माण करणारा घटक म्हणजे या अंधश्रद्धा... खरचं, खूप काही उद्ध्वस्त करून टाकतात या अंधश्रद्धा...

या अंधश्रद्धा तर आहेचं, पण आपल्या समाजात सर्वात मोठी घोटवळणारी गोष्ट म्हणजे, जात-धर्म... अगदी इतक्या प्रमाणात, कि जगण्या-मरणाचा प्रश्न उभा राहतो...

आता जाती-धर्म या गोष्टी फक्त एका मुली-मुलाचं प्रेम यावरचं दर्शवलं जात नाही... तर, आपल्या या समाजाने एकजुटीने, एकतेने रहावं, समभाव-धर्म राखवावा, यासाठी....

प्रेम हि काय वाईट गोष्ट नाही, आणि प्रेम जात-धर्म पाहूनच करावं, असं तर बिलकुल नाही...

हे खरं आहे कि, प्रेमाच्या नावाने, आज तरुण मुलं-मुली भटकत आहे, वायला जात आहेत... पण प्रेम हे विवेकी देखील असू शकतं...

आपल्या समाजात भलत्याचं प्रेमाच्या व्याख्या आहेत... पण “खरं प्रेम” किंवा “विवेकी प्रेम” हे कुणी जाणून घेण्याचा प्रयत्नचं करत नाही... खऱ्या प्रेमात विचार समजून घ्यावे लागतात एकमेकांचे, स्वभाव समजून घ्यावे लागतात... त्या प्रेमाला अर्थपूर्ण जगवण्यासाठी, अर्थपूर्ण अश्या सोबतीची शपथ, अशी सादगी निभावी लागते... नुसतं रंग-रूप पाहून जमत नसतं... जसं झटक्यात लग्न जमवली जातात...

हे भलतचं किंवा timepass चालणार प्रेम आणि झटक्यात लग्न, यांत फरक काय राहील मग???

अर्थपूर्ण विचार द्या प्रेमाला, तुमच्या साद्गीला, सोबतीला.. मग, जीवन पण अर्थपूर्णतेचे लाभेल...

पहा पटतंय का???


© yogi