...

5 views

मैत्री ❣️

मैत्री म्हटलं की आठवते ती शाळा
जिथे नव्हती कसली चिंता, काळजी
होती ती फक्त मित्र मैत्रिणीं सोबत धमाल

मैत्री म्हटलं की आठवतात कॉलेज चे दिवस
जिथे मनाला पंख फुटले होते आणि
कॅन्टीन वर बसत, अभ्यास सोडून
गावभरच्या गोष्टी व्हायच्या

मैत्री म्हटलं की आठवते ते कॉल
वेळ न बघता उगच काॅल करून
मित्रांना त्रास देण्याचा छंद
झोप येत असली तरी जबरदस्तीने
बोलायला लावण्याची मज्जा

मैत्री म्हटलं की आठतात ते दिवस
जेव्हा आयुष्यात दुःखाचं वादळ होत
पण त्यात सोबत होत माझा मित्र परिवार
आनंदात तर विचारुच नका
बस, मग तर राडा होता आमचा

आज ही आहेत सर्व सोबत
अंतर जरी वाढलं आमच्या मधलं
तरी मनाने अजुन ही जवळच आहोत
या अंतरा मुळे आमच्या मैत्रीचा गोडवा
आता अजून वाढला

© kk_jazbaat

#marathikavita #writopoem #poetrylovers #marathi #kk_jazbaat