...

4 views

एकतर्फी प्रेम (पार्ट 2)
नंतर त्यांचे काॅलेज सुरू होते . काॅलेज च्या पहिल्या दिवशी सगळे जण आदिती चे वेलकम करून क्लास रूम मध्ये जातात .
लेक्चर'स संपल्यावर सगळे घरी जायला निघतात . प्रतिक चे & आदिती चे घर एकाच बिल्डिंग मध्ये असल्याने दोघ सोबत जातात . हे सिद्धार्थ ला खटकते . सिद्धार्थ मनोमन ठरवतो .की काही ही झाले तरी आदिती ला प्रतिक च्या जवळ जाऊन देणार नाही .ती फक्त माझीच आहे . पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
प्रतिक आदिती सोबत ओळख झाल्यापासून तो काही ना काही कारणाने आदिती च्या घरी जायचा . आदिती च्या आई बाबांना प्रतिक चा स्वभाव आवडायचा . आदिती चे बाबा मनात च बोलायचे आपल्या आदु साठी हा मुलगा परफेक्ट आहे. एक दिवस आदिती नसताना आदिती चे बाबा प्रतिक ला एकांतात घेऊन विचारतात . की तुला आदिती आवडते का . माझ्या मुलीशी लग्न करनार . प्रतिक ला सुद्धा हेच पाहिजे होते . पण तो मनातुन घाबरला होता . त्याला वाटले आदिती चे बाबा अचानक पणे असे का विचारायला लागले .& त्यांना माझ्या मनातले कसे समजले . असा मनात विचार करत बसला . तेवढ्यात आदिती च्या बाबांनी त्याच्या पाठीवर वर थाप मारत बोलले अरे कशाचा विचार करत आहेस . तुला नाही आवडत का आदिती . नसेल तर मला स्पष्ट पणे सांग बाळ . मी तुला जबरदस्ती नाही करनार . मी सहजच विचारलं. तुझा स्वभाव छान आहे . सगळ्यांमध्ये मिळुनमिसळुन राहनारा आहेस . & सगळयात Important म्हणजे तुम्ही दोघं छान मित्र आहात . तु मला न घाबरता सांग तुझ्या मनात काय आहे . मी तुझ्या डोळ्यांत आदिती विषयी प्रेम बघितले आहे . ( प्रतिक ) हो बाबा माझे प्रेम आहे आदिती वर पण आदिती ला कसे सांगू कळतच नाही . कारण तिला प्रेम वगैरे आवडत नाही . (बाबा) अरे तु कशाला टेंशन घेतोस .मी सांगतो आदु ला ती माझा कधीच शब्द खाली पडून नाही देणार याची खात्री आहे मला . ती हो बोलली की पुढच्या महिन्यात साखरपुडा करून टाकू . मग तुमचे काॅलेज Complete झाल्यावर लग्न लावू . ( प्रतिक) अहो बाबा तुम्ही तर प्लान च करून ठेवलाय की . (बाबा) हो मला वाटते की माझी परी सुखात राहायला हवी . (प्रतिक) तुमची काळजी समजतेय मला बाबा . मी आदिती ला नेहमी सुखात ठेवीन .
आदिती घरी आल्यावर तिचे बाबा तिला प्रतिक बद्दल विचारतात . ती त्यांचे बोलणे ऐकून शाॅक झाली . ती म्हणाली बाबा तुम्ही जो डिसीजन घेतला तर तो योग्य च असेल . असे बोलून ती निघून जाते .
ईकडे सिद्धार्थ आदिती ला प्रपोज कसे करायचे हा प्लान करत असतो . दुसऱ्या दिवशी सगळे काॅलेज च्या ग्राउंड मध्ये ऊभे असतात . सिद्धार्थ ही तिथे येतो . प्रतिक त्याला ही Engagement card देतो . सिद्धार्थ चा मुड खुप आॅफ होतो . ते कार्ड बघुन तो काही न बोलताच तिथुन निघुन जातो .
आज आदिती खुप छान तयार झाली होती . सिद्धार्थ ही बॅग घेऊन हाॅल बाहेर ऊभा असतो . थोड्या वेळाने आदिती ची प्रतिक ची Engagement पार पडते . आदिती ला लास्ट बघून तो कायमचा पुण्याला निघुन जातो .
सिद्धार्थ पुण्यामध्ये त्याच काॅलेज Complete करतो . सिद्धार्थ एकटाच राहत असल्याने त्याला बाजुच्या काकी रोज जेवण करण्यासाठी बोलवत असतं. त्यांच्या फॅमिली ने सिद्धार्थ ला फॅमिली मेंबर बनवून घेतले होते . सिद्धार्थ ला रोज काजल च जेवायला वाढायची . सिद्धार्थ ने काही दिवसात च काजल च्या मनात घर केले होते . तिला सिद्धार्थ खुप आवडायचा .दोघांन चे ही जाॅब जवळच असल्याने दोघेही सोबत च जायचे .
पावसाळा महिना होता . त्यामुळे त्यादिवशी खुप पाऊस पडत होता . सिद्धार्थ ही लवकर च घरी येतो . पण काजल रात्रीचे १० वाजले तरी अजून घरी आलेली नसते. काजल च्या आई बाबांना खुप काळजी वाटते . ते हा सगळा प्रकार सिद्धार्थ ला सांगतात . सिद्धार्थ बाबांना बोलतो बाबा तुम्ही नका काळजी करु मी घेऊन येतो तिला . असे बोलून सिद्धार्थ काजल च्या आॅफीस मध्ये जातो . आॅफीस मधल्या सगळ्या लाईट गेल्या होत्या . काजल एकटीच बसलेली होती . तो काजल जवळ जाऊन बसतो . काजल त्याला मीठी मारून बोलते बर झाल सिद्धार्थ तु आलास मला खुप भीती वाटत होती . सिद्धार्थ बोलतो हो तुझ्या बाबांनी पाठवले आहे मला . नंतर काजल सिद्धार्थ च्या खांद्यावर डोकं ठेवून झोपते . सिद्धार्थ रात्र भर जागाच असतो . सकाळचे ऊन काजल च्या डोळ्यांवर पडल्यामुळे तिला जाग येते . & आणि सिद्धार्थ ला बोलते मी रात्र भर तुझ्या खांद्यावर झोपली होती मला जागे का नाही केलेस तु सिद्धार्थ बोलतो तु मस्त झोपली होतीस मग कस जाग करू तुला . बर चल घरी जाऊ आई बाबां वाट पाहत असतील . थोड्या वेळाने दोघेही घरी पोहोचतात . घरी आल्यावर बाबा सिद्धार्थ चे आभार मानतात .
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दोघेही आॅफीस मध्ये जाण्यासाठी निघतात . काजल सिद्धार्थ ला मध्येच गाडी थांबववयला सांगते . आणि सिद्धार्थ ला तिच्या मनातलं सांगुन टाकते . पण सिद्धार्थ काजल ला सरळपणे नकार देतो . तो तिला सगळ सांगतो . त्यामुळे काजल चा मुड खुप आॅफ होतो .
दुसऱ्या दिवशी तो काजल च्या घरी जातो . दरवाजा असाच लोटलेला . तो आवाज देतो पण कोणी आवाज देत नाही . तो खुप घाबरतो . तेवढ्यात काजल समोर येते आणि बोलते अरे आई बाबा सकाळी च मुंबई ला गेले आहेत . चुलत बहीणी चे लग्न आहे . मला पण जायचे आहे पण तुझ्यासाठी थांबले होते . सिद्धार्थ बोलतो बर चल मी सोडतो तुला .
दोघेही मुंबई ला जातात . सिद्धार्थ बघुन शाॅक होतो . कारण काजल चुलत बहीण दुसरी तिसरी कोण नसुन आदिती च असते . तो तिथुन निघुन जातो . काजल ही त्याच्या मागे जाते . ती बोलते अरे काय झाल तु असा निघुन का आलास . सिद्धार्थ काजल वर खूप ओरडतो . तु का नाही मला सांगितलेस आदु तुझी बहिण आहे ते मी आलोच नसतो ना ईथे . काजल बोलते अरे मला तु तिचे संपूर्ण नाव नाही सांगितलंस मग मी कशी सांगनार . सिद्धार्थ Please तु नको त्रास करून घेऊस मी आहे ना तुझ्यासोबत .माझ खुप प्रेम आहे सिद्धार्थ Please विसर आता आदिती ला . अस त्रास करून सगळे नीट होणार आहे का . नाही ना मग & मला सगळे माहीत आहे तरी सुद्धा मी एवढ प्रेम करते तुझ्यावर . सिद्धार्थ ला तिचे बोलणे पटते . आणि तो तिच्याशी लग्न करायला तयार होतो .
थोड्या दिवसांनी सिद्धार्थ & काजल चे ही लग्न होते . पण तो अजुनही आदिती ला विसरू शकत नव्हता . तो या पुढे कधीच मुंबई ला गेला नाही . नेहमी मुंबई ला जायला टाळत असे .
शेवटी सिद्धार्थ मनापासून प्रेम करूनसुद्धा त्याला त्याचे. प्रेम मिळाले नाही . त्याचे प्रेम एकतर्फी च राहिले .
मित्रांनो शेवटी जे नियतीच्या मनात असते तेच होत असते .


🙏🙏