गुप्तहेर आकांक्षा (भाग एक)
आज राजमाने कुटुंबियांसाठी खूप खास दिवस होता. विलास राजमाने यांची पत्नी वैजयंती यांचा आज पन्नासावा वाढदिवस. रात्री वाढदिवसाची पार्टी असल्याने बंगल्यावर गडबड चालू होती. सोहम आणि आर्या बेडरूममध्ये आपल्या आईसाठी सरप्राईज प्लान करत होते. संध्याकाळी सात वाजता हळू हळू पाहुणे येण्यास सुरुवात झाली. सर्वजण आले तेव्हा सौ. राजमाने म्हणजेच वैजयंती या आपले पती विलास यांच्या समवेत हॉलमध्ये आल्या. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. सोहम आणि आर्या पुढे आले. आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आर्याने आईला घट्ट मिठी मारली.
सौ. वैजयंतीसाठी आणलेला केक हॉलच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता. वाढदिवसाच्या समारंभाला सुरूवात झाली. सौ. वैजयंती यांनी हलक्या हाताने केक कापला. त्यानंतर केकचा एक पीस त्यांनी आपले पती विलास यांना भरविण्यासाठी हातात घेतला परंतु विलास यांनी तो केकपीस खाल्ला नाही. तो पीस ते वैजयंती यांना भरवणार तोच पूर्णतः अंधार झाला. लाईट काही क्षणच गेली होती परंतु जेव्हा लाईट आली तेव्हा सर्वांनी जे पाहिलं ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. वैजयंती जमिनीवर पडल्या होत्या आणि त्यांच्या ओठांतून फेस येत होता. सर्वजण पाहतच राहिले. काही वेळाने त्यांचे लक्ष तिथे जवळच बेशुद्ध पडलेल्या राजमाने यांच्या घरात काम करणाऱ्या सदानंद यांच्यावर गेले. ते जमिनीवर बेशुद्ध पडले होते आणि कपाळावर झालेल्या जखमेतून रक्त येत होते. काहीजण तिकडे धावले. वैजयंती आणि सदानंद यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. सदानंद तर शुद्धीवर आले पण, वैजयंती यांना शुद्ध आली नाही. तसेच त्यांचे ओठही निळसर पडले होते.
आर्याची मैत्रीण अपूर्वाही तिथे होती. तिने आपल्या मोबाईल वरून एक कॉल केला आणि म्हणाली, "लवकर ये. मी तुला ऍड्रेस पाठवते. इथे खूप गडबड झाली आहे. काकी बेशुद्ध पडल्या आहेत." काही वेळाने पोलीसही आले. पोलीसांनी तपास आणि चौकशी करण्यास सुरुवात केली. इन्स्पेक्टर प्रधान सूचना देत होते मार्कींग वगैरे कुठे करायची?? कशी करायची ते सांगत होते. तोच अपूर्वाची बहिण आकांक्षा तिथे आली. अपूर्वाने आर्या, सोहम आणि विलास यांच्याशी आकांक्षाची ओळख करून करून दिली. आकांक्षा एक खाजगी गुप्तहेर होती. तिने आधीही दोन तीन केसेस सोडवल्या होत्या.
...
सौ. वैजयंतीसाठी आणलेला केक हॉलच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता. वाढदिवसाच्या समारंभाला सुरूवात झाली. सौ. वैजयंती यांनी हलक्या हाताने केक कापला. त्यानंतर केकचा एक पीस त्यांनी आपले पती विलास यांना भरविण्यासाठी हातात घेतला परंतु विलास यांनी तो केकपीस खाल्ला नाही. तो पीस ते वैजयंती यांना भरवणार तोच पूर्णतः अंधार झाला. लाईट काही क्षणच गेली होती परंतु जेव्हा लाईट आली तेव्हा सर्वांनी जे पाहिलं ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. वैजयंती जमिनीवर पडल्या होत्या आणि त्यांच्या ओठांतून फेस येत होता. सर्वजण पाहतच राहिले. काही वेळाने त्यांचे लक्ष तिथे जवळच बेशुद्ध पडलेल्या राजमाने यांच्या घरात काम करणाऱ्या सदानंद यांच्यावर गेले. ते जमिनीवर बेशुद्ध पडले होते आणि कपाळावर झालेल्या जखमेतून रक्त येत होते. काहीजण तिकडे धावले. वैजयंती आणि सदानंद यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. सदानंद तर शुद्धीवर आले पण, वैजयंती यांना शुद्ध आली नाही. तसेच त्यांचे ओठही निळसर पडले होते.
आर्याची मैत्रीण अपूर्वाही तिथे होती. तिने आपल्या मोबाईल वरून एक कॉल केला आणि म्हणाली, "लवकर ये. मी तुला ऍड्रेस पाठवते. इथे खूप गडबड झाली आहे. काकी बेशुद्ध पडल्या आहेत." काही वेळाने पोलीसही आले. पोलीसांनी तपास आणि चौकशी करण्यास सुरुवात केली. इन्स्पेक्टर प्रधान सूचना देत होते मार्कींग वगैरे कुठे करायची?? कशी करायची ते सांगत होते. तोच अपूर्वाची बहिण आकांक्षा तिथे आली. अपूर्वाने आर्या, सोहम आणि विलास यांच्याशी आकांक्षाची ओळख करून करून दिली. आकांक्षा एक खाजगी गुप्तहेर होती. तिने आधीही दोन तीन केसेस सोडवल्या होत्या.
...