...

6 views

Family
एका ठिकाणी दोन वृद्ध बोलत होते...

पहिला वृद्ध : - माझी एक नात आहे, लग्नाची बाकी...
BE केले आहे, नोकरी करते,
उंची - ५ "२ इंच आहे .. सुंदर
आहे, जर एखादा मुलगा नजरेत
असेल तर सांगा...

दुसरा वृद्ध : - तुमच्या नातीला कुटुंब कसे हवे आहे ... ??

पहिला वृद्ध : - विशेष काही नाही .. बस एक मुलगा, ME/ M.TECH केलेला असावा, स्वतःचे घर असावे, गाडी असावी, घरी AC असावी, घरात बगीचा असावा, चांगली नोकरी, चांगला पगार लाखाच्या घरात असावा...

दुसरा वृद्ध : - आणखी काही…

पहिला वृद्ध :- होय, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो एकटा असावा.
आई-वडील, भाऊ-बहिण कुणीच नसावेत...
ते काय भांडणं होत असतात ना म्हणून...?

दुसऱ्या वृद्धाचे डोळे भरून आले,
डोळे पुसत तो म्हणाला :- माझ्या एका मित्राचा नातू आहे, त्याचे भाऊ-बहिण नाही आहेत, त्याचे आई-वडिल अपघातात वारले आहेत, चांगली नोकरी आहे, दीड लाख पगार आहे, गाडी आहे, बंगला आहे, नोकर-चाकर आहेत...

पहिला वृद्ध : - मग तर ठरवूनच टाकू,

दुसरा वृद्ध : - पण त्या मुलाचीही अशीच अट आहे की मुलीलाही आई-वडिल, भाऊ-बहिण, किंवा कोणतेही नातेवाईक नसावेत...
बोलता बोलता त्यांचा गळा भरून आला..
मग म्हणाले:- जर तुमच्या कुटुंबाने आत्महत्या केली तरच लग्नाचे जमून जाईल.. तुमच्या नातीचं लग्न त्याच्याशी होऊ शकेल आणि ती खूप सुखी होईल….

पहिला वृद्ध : - हा काय मूर्खपणा आहे, आमच्या कुटुंबाने आत्महत्या का करावी .. उद्या तिच्या सुख, दु:खात कोण तिच्यासोबत, तिच्याजवळ असणार ?

दुसरा वृद्ध:- व्वा रे, माझ्या मित्रा.. स्वतःचे कुटुंब, कुटुंब, आणि दुसऱ्याचे काहीच नाही... माझ्या मित्रा आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाचे महत्त्व समजावून सांग, घरातले लहान घरातले मोठे सर्वच आपल्या माणसांसाठी महत्त्वाचे असतात... अन्यथा मनुष्य सुख दु: खाचे महत्त्व विसरून जाईल, आयुष्य जगण्यात रसच राहणार नाही…

पहिलावाला वृद्ध लाजेने काही बोलू शकला नाही..

मित्रांनो कुटुंब आहे म्हणूनच आयुष्यातलं प्रत्येक सुख, सुख वाटते , जर कुटूंबच नसेल तर कोणासोबत आपले सुख आणि दु:ख वाटणार?
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
© VARSHA NAIR