...

2 views

चिमणी
अनेक घटनांनी माणूस घडत जातो...बदलत जातो...माझ्या बालपणाचा काळ फार समृद्ध होता.येथेच्छ फिरायचं, बागडायचं, चिमण्यांना पकडण्याचा प्रयत्न करायचा. झाडावर चढून खाली उड्या मारायच्या. खराटी(आमच्या वावरातील छोटा पाणी वाहत ठेवणारा नाला)मधल्या वाळूत झिरा बनवायचो त्या झि-यातले पाणी प्यायचे. खूप झाड लावायची, काही झाडे इतरांना वाटायची.चिमण्यांना पकडून पिवळा रंग द्यायचा.कारण त्यावेळी आम्हाला सांगितले होते की तुम्ही चिमणी पकडली किंवा तिला माणसाने हात लावला. तर दुसऱ्या चिमण्या तिला चोची मारून, मारून टाकतात.काय तर चिमणी ही बामणीनं आहे आणि...