...

4 views

समय यात्रा
चांगल्या वाईट आठवणींसाठी
भूतकाळ आहेच आपल्यापाशी ,
साठवल्यात आठवणी जर भविष्यातील
तर " स्टेपनी " जोडावी लागेल उराशी ।
घडलंच जर अवचित असं तर
होतील युद्ध मेंदूच्या रणांगणात ,
कित्येक नविन जुने मारेकरी
मृत्यू पावतील वर्तमान अंगणात ।
असेल वरचढ सारखी आठवणींची
ठरेल पातळी जीवघेण्या संघर्षाची ,
श्रेष्ठ कनिष्ठतेचे होईल मोजमाप
घडेल क्रांती दुर्बलांच्या उत्कर्षाची ।
मन असेल मात्रं तंत्र विकसित
नसतील भावना तेव्हढ्या कदाचित ,
संगणक शास्त्राच्या आधुनिक जगात
घडेल मानवी यंत्र असेही अवचित ।

✒️कवी,
... विजय दागमवार
© 💫अक्षरांच्या ओळी