10 views
विरह
हजारो कळा ह्रदयात
जेंव्हा मित्र दुरावतात
अंकुर फुटती मनास
मित्रांच्या गोतावळ्यात
जसे उगाळावे चंदन
तशा आठवणी खास
आठवणींचा उमाळा
चिंब करतो शब्दांस
जखडले जातात मने
स्नेहाच्या बंधनात
जीवापाड जपले जाते
नाते प्रत्येक हृदयात
एक दिवस असा येतो
दुरावा अपरिहार्य ठरतो
त्या क्षणी जडावते मन
आठवणींचा ठेवा उरतो
© Soman
जेंव्हा मित्र दुरावतात
अंकुर फुटती मनास
मित्रांच्या गोतावळ्यात
जसे उगाळावे चंदन
तशा आठवणी खास
आठवणींचा उमाळा
चिंब करतो शब्दांस
जखडले जातात मने
स्नेहाच्या बंधनात
जीवापाड जपले जाते
नाते प्रत्येक हृदयात
एक दिवस असा येतो
दुरावा अपरिहार्य ठरतो
त्या क्षणी जडावते मन
आठवणींचा ठेवा उरतो
© Soman
Related Stories
7 Likes
0
Comments
7 Likes
0
Comments