...

16 views

जीवन
कातरवेळी सावली अलगद निघून गेली
पुन्हा एकदा एकटे पनाची जाणीव करून गेली
उधाण समुद्र ही आता शांत झाला
जनु त्याच्या आठवणींनाही उजाळा आला
पुन्हा पुन्हा तेच भास होत असतात
गतकाळच्या आठवणी सारख्या छळत असतात
ठरवलंय आता सगळं काही पुसून टाकायचं
पुन्हा एकदा स्वप्नांच्या आकाशात उडून जायचं
जे जे शक्य आहे ते सर्व काही मिळवायचं
आयुष्याला एका नवीन झालरीने विनायच
जगताना सुख दुःख येतच असतात
त्यांना न घाबरता लढणं यालाच तर जीवन म्हणतात.......